मराठी
भारत म्हणजे हिंदुस्तान, यातून हिंदू वेगळा होऊच शकत नाही- मोहन भागवत
विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर आज प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा :
1. भारताला 'भारत' ठेवायचं असेल तर हिंदुंना 'हिंदू'च राहावं लागेल-मोहन भागवत
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात हिंदुंनी एकजूट दाखवण्याची गरज असल्याचं वक्तव्य केलं आहे.
मोहन भागवत यांनी हिंदुंची संख्या आणि शक्तीही कमी झाल्याचं म्हटलं आहे. हिंदुंना हिंदू राहण्यासाठी भारत अखंड राहायला हवा आणि भारताला 'भारत' राहायचं असेल तर हिंदुंना 'हिंदू'च राहावं लागेल, असं भागवत म्हणाले.
भाजपला महाराष्ट्रात या 5 कारणांमुळे 'ऑपरेशन कमळ' जमलं नाही का?
Omicron : महाराष्ट्रात निर्बंधांची नवी नियमावली, कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची धास्ती
भारताशिवाय हिंदू आणि हिंदूंशिवाय भारत अशी कल्पनाच शक्य नसल्याचं भागवत म्हणाले. भारत म्हणजे हिंदुस्तान आहे आणि यातून हिंदू वेगळा होऊ शकत नाही, असंही ते म्हणाले.
धार्मिक लोकसंख्येचा उल्लेख करतही भागवत यांनी काही मुद्द्यांकडे संकेत केला. सामाजिक आणि आर्थिक अस्थिरता कुठे आहे? देशाच्या अखंडतेला आणि एकतेला धोका कुठे आहे? ते पाहा असं भागवत म्हणाले.
एनडीटीव्हीनं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
2. नव्या विषाणूची चिंता, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण
कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून म्हणजे जवळपास गेल्या दोन वर्षात कोरोना कमी झाला असं वाटू लागतात, नवा एखादा विषाणू येतो आणि पुन्हा चिंता वाढतात. सध्यादेखील आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या विषाणूनं चिंता वाढवली आहे.
प्रातिनिधीक फोटो
दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानं भारताच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून बेंगळुरू विमानतळावर दाखल झालेल्यांमध्ये या दोन कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाचा हा नवा विषाणू आढळला की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शनिवारी (27 नोव्हेंबर) बेंगळुरूच्या विमानतळावर उतरलेल्या विमानातून दक्षिण आफ्रिकेतून 94 जण आले होते. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेचे दोन नागरिक कोरोनाग्रस्त आढळले आहे. इतर सर्वांना ट्रॅक करून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.
सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, तर काही प्रवाशांची माहिती घेणं अजूनही सुरू आहे.
एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.
3. देशद्रोहाच्या प्रकरणात अटक झालेल्या शरजील इमामला जामीन मंजूर
अलिगढ मुस्लीम विद्यापीठात देशविरोधी भाषण दिल्याप्रकरणी देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या शरजील इमामला अलाहाबाद हायकोर्टानं जामीन मंजूर केला आहे.
सीएए आणि एनआरसीच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान शरजील यांनी भाषण केलं होतं. ते भाषण देशविरोधी असल्याच्या कारणावरून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली होती.
Comments
Post a Comment